प्रतिनिधी / एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील नागरिक उन्हाच्या तलाशयाने त्रस्त झालेले असतानाच आता. हवामान विभागाने वेगळाच अंदाज वर्तवला आहे. काल राज्यात अनेक भागात अवकाली पाऊस पडला, वादली वाऱ्यांसह पावसाची हजेरी अनेक भागात लागली.
दरम्यान राज्यात आजही जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडनार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यात आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. बारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याला बुधवारी आणि गुरुवारी देखील अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारपासून पाऊस कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील अनेक भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे, नाशिक, अहिल्यानगर ,सातारा, छत्रपती संभाजी नगर ,जालना ,बीड ,अमरावती व चंद्रपूर.
राज्यात मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर काही ठिकाणी दुपारपासून विजेच्या कडकडासह मुसलदार पाऊस कोसळला आहे. याच पार्श्वभूमीमुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रात विविध भागात पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. घाटमात्यासह शहरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाली पावसासाठी अलर्ट राहणे आणि सज्ज राहावे अशा सूचना नागरिकांना देण्यात आले आहेत.


Post a Comment
0 Comments