खालापूर चौक. प्रतिनिधी.. मोरबे धरणाची उपनदी असलेल्या धावरी नदीत दोन चिमूरड्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण जांभिवली गावात दू:खा ची सावट पसरली आहे.
सकाळी १२ वाजल्याच्या सुमारास कुमारी आराध्या संजय गावडे वय वर्ष ५ व आरव विजय गावडे वय वर्षे अंदाजे ५ ह्या दोन सख्या चुलत भावा बहिणीचा धावरी नदीत बुडून मृत्यू झाला. हे दोघे सकाळी आपली आई काकी हिच्या बरोबर नेहमी प्रमाणे नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते, आई काकी कपडे धूत असताना या दोघांनी पाण्यात अंघोळ केली कपडे धुऊन झाल्यावर आई काकी सोबत घरी आले काही वेळाने ते घरी किंवा शेजारी कुठे खेळत नसल्याचे दिसल्यावर शोध सुरू झाला. त्यावेळी ते पुन्हा नदीवर गेले का ,अशी शंका आल्याने नदीवर जाऊन पाहणी केली असता कुमारी आराध्या ही पाण्यावर तरंगत असताना दिसली, लागलीच आरव चा शोध पाण्यात घेतला असता तो पाण्यात चिखलात अडकल्याचे निदर्शनास आले. दोघांनाही चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ही दुर्घटना समजताच परिसरातील नातेवाईक, मित्र परिवार, ग्रामस्थ याच्यात हळहळ व्यक्त होत होती.
दोघेही निरागस बालकांचा मृत्यू झाल्याने घरातील वातावरण शोकात बुडाले आहे. नदीच्या दोन्ही बाजूला उतार असून सर्व भाग खडकाळ आहे. चौक चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे, स.पो.नी. युवराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत...

Post a Comment
0 Comments