मुंबई.. प्रतिनिधी.. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार असा प्रश्न विद्यार्थी व पालक यांना पडला आहे. यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे.ते म्हणाले की दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. आज मुबईत एका आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले, दीपक केसरकर म्हणाले आहेत की बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत ती मुलं परीक्षेत पुन्हा बसू शकतात. परीक्षा लवकर घेण्याची सूचना केल्या आहेत, केसरकर म्हणाले कोणीही नाराज होऊ नये, संधीचा फायदा विद्यार्थ्याने घ्यावा. ते म्हणाले दहावीचा निकाल 27 मे ला लागू शकतो.
कथित आरटीई घोटाल्यावर बोलताना केसरकर म्हणाले की याला घोटाला म्हणता येणार नाही कोणीही खोटी कागदपत्रे तयार करू नये, ऍडमिशन ही जिल्हास्तरीय होते जिल्हास्तरावर गुन्हा नोंदवला आहे, गैरप्रकार कसे रोखता येईल याबाबत प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील बारावीचा निकाल जाहीर यंदाही मुलींची भाजी 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीत एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी या परीक्षेत एकूण १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन.

Post a Comment
0 Comments